
बरेच काही उगवून आलेले
​
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...
- द. भा. धामणस्कर
मुक्तछंद आणि निसर्ग यांचा सुरेख मिलाफ असलेल्या कविता ही धामणस्करांची शैली. वरवर निसर्ग-कविता वाटल्या तरी त्यांच्या कवितांमध्ये फार सुंदर विचार मांडलेले आहेत. आयुष्यावर, स्वभावावर, तत्वज्ञानावर. वपु जसे तत्त्वज्ञान गद्यातून मांडतात तसेच धामणस्कर पद्यातून.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात, त्यांच्या
निमूट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.
ही एक कवी रुपी नदी, चौदा ऑगस्टला अनंतात विलीन झाली. आपल्यामागे कवितांनी पेरलेले असंख्य सुंदर विचार ठेवून. द.भा. धामणस्करांना ही एक श्रद्धांजली.